मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१८

काळ परिमाण !


मृत्यूनंतर नक्की काय होतं ह्याविषयी मनुष्यज्ञातीत प्रचंड कुतूहल आहे. ह्याविषयी विविध धर्मांच्या, समुहाच्या विविध धारणा आहेत. त्याविषयी इथं मी काही बोलु इच्छिणार नाही. परंतु सामान्य माणसाच्या मनात असणारं प्रचंड भय म्हणजे मृत्यूनंतर समजा आपल्याला शरीरविरहीत स्थितीत एखाद्या महाभयंकर प्रतिकुल परिस्थितीत प्रदीर्घ काळ रहावं लागलं तर? शरीर नसल्यामुळं प्रतिकुल परिस्थितीवर काही मर्यादा येऊ शकतात असं सुरुवातीला आपणांस वाटणं स्वाभाविक आहे जसं की उलटं टांगवुन खालुन मिरचीचा धुर सोडणे असे हाल करायचे असतील तर शरीर आवश्यक आहे. 

परंतु शरीरविरहित परिस्थितीमध्येसुद्धा तुम्हांला  मानसिक क्लेशाच्या परिसीमेपलीकडं  प्रदीर्घ काळ राहायला लावून तुमचा छळ होऊ शकतो, जसे की सर्व आप्त मित्र तुम्हाला सोडून जात आहेत!  तुमचे सर्व धन संपुष्टात आले आहे वगैरे वगैरे!! आणि मुख्य म्हणजे प्रदीर्घ काळाची व्याख्या ही मानवी जीवनाच्यापलीकडे नक्की काय आहे हे समजू शकत नाही. समजा या पोस्टच्या सुरुवातीला दिलेल्या चित्राच्या परिस्थितीत तुम्हाला एकट्याला हजारो वर्षे शरीरविरहीत अवस्थेत राहावं लागलं तर तुमची मनस्थिती कशी होईल? तुमच्याशी संवाद साधण्यासाठी कोणी नसेल आणि मनातील विचारांशी तुम्ही संघर्ष करीत असाल!!

एक गोष्ट आहे ती कदाचित काही वर्षानंतर तुमची ही मनस्थिती बदलून तुम्ही सुर्यकिरणांनी उल्हसित झालेल्या बागेत फुलपाखरांच्या सोबतीने गाणं गाऊ लागला असाल! परंतु हा दिवस पाहण्यासाठी कदाचित तुम्हाला या अंधार्‍या ढगाळलेल्या समुद्रकिनाऱ्यावर हजारो वर्ष काढावी लागतील. 

आता हे सर्व सुचायचं कारण काय तर पाचव्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाची स्थिती! चौथा कसोटी सामना हरल्यानंतर या मालिकेला काही अर्थ उरला नाही तरीसुद्धा हा पाचवा सामना त्यांना खेळावा लागला.  ज्या परिस्थितीची मनातून तीव्र चीड येते त्या परिस्थितीला परिस्थितीला जसे की बटलरला आऊट करता येत नाही किंवा पहिल्या तीन षटकात आपले दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूत परतणे या परिस्थितीचा सामना द्यावा लागतो. खेळाडूंना या परिस्थितीचा मनातून कितीही तिटकारा वाटत असला तरीही त्यांना जगभरात पसरलेल्या दर्शकांसाठी आणि वाचकांसाठी हसरा चेहरा ठेवून Going Through the motion हा प्रकार पार पाडावा लागतो. आणि त्यानंतर शब्दबहाद्दूर व्यवस्थापकांची मीडियाला दिलेली मुक्ताफळे सुद्धा ऐकावी लागतात. 

सांगता करताना भारतीय संघाला संदेश - सूर्यप्रकाशाने आच्छादित  मैदानात फुलपाखरांच्या सभोवती बागडण्याची संधी आयपीएलच्या निमित्ताने एप्रिलमध्ये येणारच आहे!! मधले ऑस्ट्रेलियाचा दौरा वगैरे कठीण प्रकार शांतचित्ताने पार पाडून घ्या!! नाहीतरी त्या अंधाऱ्या समुद्रकिनारी हजारो वर्ष एकट्याने घालवण्यापेक्षा हा प्रकार काहीसा सहन करण्यासारखा आहे!! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...