कधी तिने मनोरम रुसणे
कधी तिने मनोरम रुसणे
कधी तिने मनोरम रुसणे
कधी तिने मनोरम रुसणे


मराठी माध्यमातुन इंग्लिशचे धडे अगदी एकाग्रतेने गिरवुन व्यावसायिक जगात प्रवेश करून आता अनेक वर्षे लोटली. This is a boy. His name is Gopal. He is reading a book. इथून आमची इंग्लिशशी तोंडओळख झाली. इंग्लिश भाषेचा वापर करताना देखील मराठी भाषेचा पगडा कायम होता. सागर चित्रपट प्रसिद्ध झाला त्यावेळी डिंपलचे स्पेलिंग Dimpal असावे ह्याविषयी आमच्या सर्वांचं एकमत होतं. बरीच वर्षे उलटुन गेली. व्यावसायिक जगात नवनवीन वाक्प्रचारांचा वापर ज्यावेळी प्रथमच ऐकला त्यावेळी मनातील विनोदी बुद्धी जागृत झाली. हे वाक्प्रचार आता मी ही सर्रास वापरतो. पण अजुनही हे विनोदी विचार मनात अधुनमधून येत राहतात.
Keep Me Honest Here
खरा अर्थ - एखाद्या संदिग्ध विषयावर आपल्या समजुतीनुसार भल्या मोठ्या मीटिंगमध्ये आपण मोठमोठी वाक्यं बोलत असतो त्यावेळी आपली समजुतच चुकीची असेल तर आपल्या पुढील बोलण्याला काही अर्थच उरत नाही. अशा वेळी चारचौघात आपलं हसं होऊ नये म्हणून त्या बैठकीतील सर्वात ज्ञानी माणसाचे नांव घेऊन Keep Me Honest अशी प्रस्तावना करण्याची पद्धत आहे. असं बोललं की पुढं काहीही ठोकून द्यायला आपल्याला मोकळं रान मिळतं.
chatgpt ने बनविलेली विनोदी प्रतिमा !
Park Your Thoughts
खरा अर्थ - मीटिंग मध्ये एकाच वेळी अनेक जण बोलायला लागले की त्यातील एक माणुस दुसऱ्याला "Park Your Thoughts" अशी विनंती करतो. आपल्या स्वतःच्या विचारांची शृंखला (Chain of thoughts) अबाधित राहावी असा स्वार्थी विचार त्यामागं असतो. आता दुसरा देखील ह्याला बोलू शकतो की "You Park Your Thoughts" पण हे सभ्य लोकांचं जग असल्यानं असं काही घडत नाही. बऱ्याच वेळा पहिल्याचं बोलणं संपेपर्यंत दुसरा एक तर आपले विचार विसरलेला असतो किंवा त्याच्या मुद्द्यातील हवा निघुन गेलेली असते!
chatgpt ने बनविलेली विनोदी प्रतिमा !
आमच्या मनात आधीच इतके विचार असतात की नवीन विचारांना वाहनतळावर थांबवून ठेवायला जागाच नसते !
All things being equal
खरा अर्थ - दोन शक्यतांमध्ये निव्वळ तुलना करताना बाकीचे सर्व घटक समान असावेत.
chatgpt ने बनविलेली विनोदी प्रतिमा !
Leap of Faith
खरा अर्थ - आपल्याजवळ असलेली माहिती, उपलब्ध सामुग्री ह्यांच्या आधारे एखादं मोठं आव्हान स्वीकारताना यशाची १०० टक्के खात्री नसताना देखील पुढं जाण्याचा धाडसी निर्णय घेणं !
Groundhog Day -
हा वाक्प्रचार नसुन उत्तर अमेरिका आणि कॅनडा भागातील परंपरा आहे. दोन फेब्रुवारी रोजी जर groundhog नावाचा प्राणी आपल्या बिळातून बाहेर आला आणि आपली सावली पाहु शकला तर हिवाळा अजून सहा आठवडे टिकेल. आणि जर असं झालं नाही तर वसंत ऋतूचे आगमन लवकर होईल. यंदाचा groundhog चा कौल प्रदीर्घ हिवाळ्याच्या पारड्यात पडला आहे. आगामी भेटीसाठी नक्कीच चिंतेची बाब आहे !
(विनोदी प्रतिमांसाठी chatgpt चे आभार !)
जाता जाता एक विनोदी विचार! मागील पिढ्यांतील पुरुष पुर्वसूचना न देता पाच सहा मित्रांना घरी अचानक भोजनासाठी आणण्याची Leap Of Faith वारंवार घेत असत. आम्ही मात्र हा विचार सदैव Park Your Thoughts मध्ये गुंडाळून ठेवतो.
मी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक तत्वांचा चाहता आहे. ही तत्त्वे प्रत्यक्ष जीवनात योग्य प्रकारे वापरली तर खुप सकारात्मक बदल घडून येऊ शकतो ह्यावर माझा ठाम विश्वास आहे. वेळेअभावी आजची पोस्ट अगदी छोटी असणार आहे.
आजचं तत्त्व आहे 'आपत्कालीन व्यवस्थापन'. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ज्यावेळी एखादा मोठा बदल (आज्ञावली / infrastructure संबंधित) अंमलात आणण्याची तयारी सुरु असते त्यावेळी संबंधित टीमला अनेक मुद्द्यांची तपासणी यादी भरून द्यावी लागते. त्यातील काही महत्वाचे मुद्दे
१. ह्या बदलामुळं जर काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर ती तुम्ही कशी निस्तराल?
२. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याच्या क्षणापासून ते योग्य व्यक्तीला संदेश पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार आहे? ही संदेशवहनाची प्रक्रिया पुर्णपणे automated आहे की नाही?
३. ह्या आणीबाणीच्या परिस्थितीची रंगीत तालीम तुम्ही केली आहे की नाही? ही रंगीत तालीम प्रत्यक्षातील परिस्थितीशी किती मिळतीजुळती आहे?
टीमकडे वरील प्रश्नांची सकारात्मक उत्तरं नसतील तर त्यांना तो बदल अंमलात आणण्यास परवानगी दिली जात नाही. आणि जर ह्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरं देऊन जर बदल अंमलात आणला गेला आणि प्रत्यक्ष जीवनात (production environment) मध्ये ह्या बदलाने गोंधळ घातला तर तुमचं नाव काळ्या यादीत टाकलं जातं. पुढील बदल अमलात आणण्यासाठी तुमच्यावर अधिक कठोर बंधनं घातली जातात.
आपल्या भोवती जे सुरु आहे त्यात प्रचंड बदल अगदी किमान तपासणी यादीच्या आधारावर प्रत्यक्ष जीवनात अमलात आणले जात आहेत. ह्या सर्व मुलभूत सुविधांच्या बाबतीत आणीबाणीच्या कोणत्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात, त्यावर उपाय कसा काढावा, कोणाला तात्काळ पाचारण करावं ह्याविषयी कोणतीही सुस्पष्ट योजना कागदावर नाही. त्यामुळं आपण ह्या सर्व सुविधांचा वापर करत असताना कोणता धोका घेत आहोत ह्याची आपल्याला जाणीव असणं आवश्यक आहे. इथं मर्फीचे तत्त्व उद्धृत करावंसं वाटतं.
Murphy's Law - "Anything that can go wrong, will go wrong".
भविष्यात जर तुम्ही आंतरराष्ट्रीय उड्डाण करण्यासाठी पुण्याहून मुंबईला एक्सप्रेस वे ने निघणार असाल तर गेले दोन दिवस चाललेली महाकाय वाहतूक कोंडी लक्षात ठेवा. ही सुविधा निर्माण करणाऱ्यांनी आपत्कालीन व्यवस्थापनाकडं पुरेसं लक्ष न दिल्यानं ह्या महामार्गाचा आंतरराष्ट्रीय विमान पकडण्यासाठी वापर करण्यात जो काही धोका असतो त्याचं स्वामित्व तुम्हांलाच घ्यावं लागणार आहे!
एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील चित्रपटाची चांगल्या पद्धतीनं निर्मिती केल्याबद्दल 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' च्या सर्व चमूचे अभिनंदन! ह्या वाक्यातील मनःपुर्वक शब्दाचा वापर हेतुपुरस्सर टाळला आहे त्याची कारणे पोस्टच्या पुढील भागात उलगडतील अशी आशा !
ह्या चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित बरेचजण ह्या विषयावर प्रत्यक्ष आयुष्यातही अगदी सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यामुळं ह्या चित्रपटाविषयी फार मोठ्या अपेक्षा बाळगुन गेलो होतो.
सकारात्मक परीक्षण
१. सचिन खेडेकर ह्यांनी चित्रपटाच्या शेवटच्या काही मिनिटांत प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केलेलं मनोगत हा ह्या चित्रपटाचा सर्वोच्च बिंदु! मराठी माध्यमाच्या शाळा का टिकायला हव्यात ह्याची कारणमीमांसा अत्यंत तर्कशुध्दपणे त्यांनी मांडली. योग्य त्या परवानगीनिशी हे मनोगत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध व्हायला हवं. मुलांना मातृभाषेत शिकविलेल्या संकल्पना अत्यंत सखोल पद्धतीनं समजतात हा मुद्दा बऱ्याच जणांनी आधी मांडुन झाला आहे. पण आंतरराष्ट्रीय बोर्ड आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाला, मराठी संस्कृतीला मुलांपर्यंत पोहोचु देतच नाहीत हा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. खरेतर ह्या मुद्द्यावर भारतातील सर्व राज्यातील लोकांनी एकत्र येऊन बदल घडविण्याचा प्रयत्न करायला हवा.
२. चित्रपट राज्यातील मराठी शाळा कशा झपाट्यानं बंद पडत आहेत ह्याची सखोल आकडेवारी क्षणभर का होईना आपल्यासमोर मांडतो.
३. मराठी भाषेच्या शाळा बंद पडण्यामागं आर्थिक कारणं कोणत्या प्रकारे जोडली गेली आहेत ह्याचं विश्लेषण सुद्धा चित्रपट आपल्यासमोर मांडतो.
४. बहुसंख्य मराठी भाषिक लोकांनी, त्यांच्या खासकरून इंग्लिश माध्यमात शिकलेल्या / शिकत असलेल्या मुलामुलांनी हा चित्रपट पाहिल्यास नक्कीच त्यांना एक महत्वाचा दृष्टिकोन मिळेल!
५. मराठी माध्यमाच्या शाळा टिकविणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसुन सर्व नागरिकांचा त्यात सहभाग असायला हवा हा एक संदेश चित्रपट देतो. त्याच वेळी इंग्लिश माध्यमात मुलांना प्रवेश घेण्यामागची पालकांची जी रास्त कारणे आहेत ती सुद्धा चित्रपट आपल्यासमोर आणतो.
टीकात्मक परीक्षण
१. एक अत्यंत महत्त्वाचा विषय, चिन्मयी सुमितसारख्या ह्या विषयावर तळमळीनं काम करणाऱ्या जाणकारांचा चित्रपट निर्मितीमधील सहभाग ह्या अनुकूल गोष्टी असून देखील चित्रपटाचा बहुतांश भाग हा सवंग लोकप्रियतेसाठी चित्रीत केला गेला आहे असं मला वाटत राहिलं. सचिन खेडेकरांचे जे मनोगत अगदी चित्रपटाच्या शेवटी आपल्यासमोर येतं त्यातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर बौद्धिक चर्चा संपुर्ण चित्रपटभर करण्याची उत्तम संधी दवडण्यात आली आहे. ह्या कंपूला बौद्धिक विरोध करणारा त्यांचा सहकारी पहिल्या चर्चेनंतर विरोधी मते न पटल्याने निघुन जातो तो कायमचाच ! त्याचं पात्र चित्रपटभर ठेवून एक चांगली चर्चा घडवून आणण्याची संधी गमावण्यात आली आहे.
२. वीस वर्षांपूर्वी दोन मुलं, एक मुलगी नाईट आउट साठी पुरातन वास्तुत जातात हा न पटणारा संदर्भ चित्रपट देतो. विद्यार्थ्यांचा शिक्षिकेवर असलेला क्रश दाखविणं किमान ह्या विषयाच्या चित्रपटात टाळता आलं असतं.
३. चित्रपटातील बरीचशी पात्रं वीस - पंचवीस वर्षांच्या कालावधीत तीच ठेवली असता सायली संजीवची निर्मिती सावंत कशी झाली हे न उलगडणारं कोडं आपल्या मेंदुचा भुगा करत राहतं.
४. का कोणास ठावूक पण सचिन खेडेकर ह्यांचा अभिनय मला कधीच आवडला नाही. आपण चित्रपटातील बाकी कलाकारांपेक्षा काहीसे श्रेष्ठ असं त्यांना वाटत असावं असा मला भास होत राहतो.
माझं मत
१. मराठी माध्यमाच्या शाळा पुढे दीर्घकाळ चालवता येण्यासाठी समाजाला प्रचंड इच्छाशक्ती दाखवावी लागणार आहे. जर आपली अर्थव्यवस्था स्थानिक उद्योगधंद्यांवर अवलंबुन असती, युवकांना त्यांच्या नोकऱ्या शाबूत ठेवण्यासाठी आपल्या संस्कृतीचं ज्ञान असणं आवश्यक असतं तर मराठी / इतर स्थानिक भाषेच्या शाळा आपसुक सुरु राहिल्या असत्या. पण आपण राहतो त्या समाजातील जवळपास ८० % नोकऱ्या पाश्चात्य अर्थव्यवस्थेंवर अवलंबुन आहेत. हा एक मोठा प्रतिकुल घटक आहे.
२. सचिन खेडेकरांच्या भाषणातील एक मुद्दा उचलुन मी एक विचार मांडू इच्छितो. मराठी माध्यमाच्या शाळा आपल्याला का टिकवायच्या आहेत? ह्याचं नक्की कारण आपण जाणुन घ्यायला हवं. खेडेकरांनी म्हटल्याप्रमाणं आपला दैदिप्यमान इतिहास, संस्कृती ह्याची ओळख आपल्या पुढील पिढ्यांना होत राहायला हवी, मराठी भाषेचं सखोल वैभव आपल्या पुढील पिढयांना ज्ञात असायला हवं. मग सध्या पेव फुटलेल्या शाळांमधुनच मराठीचे सखोल ज्ञान देण्यावर, आपल्या संस्कृतीचा / इतिहासाचा सखोल परिचय करून देण्यावर आपण पूर्ण लक्ष केंद्रित केलं तर? स्थानिक इतिहास सुद्धा मराठी भाषेत शिकवा बाकी विज्ञान, गणित हे विषय इंग्लिश भाषेत शिकवणं सुरु ठेवा ! बघा मंडळी विचार करून पहा! पुर्ण मराठी माध्यमाच्या शाळांमधून आपल्या पिढीनं अनुभवलेली निरागसता काळाच्या उदरात केव्हाच गडप झाली आहे, आता आपण मराठी माध्यमाच्या शाळा जरी टिकवू शकलो तरी ही निरागसता परत आणू शकणार नाहीत.
३. माझा बालवाडीपासूनचा शालेय मित्र अनुप २००९ - २०१० च्या आसपास म्हणाला होता. शाळेतुन बाहेर पडल्यावर काही गोष्टी unlearn कराव्या लागल्या होत्या असं काहीसं तो म्हणाला होता. अगदी बरोबर होतं त्याचं म्हणणं! शाळेत शिकवलं जाणारं सर्व काही बरोबर, मोठ्या लोकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट बरोबर, त्याला आव्हान देऊ नये अशा काही गोष्टी अशी काहीशी मानसिकता मराठी माध्यमाच्या शाळांनी कदाचित निर्माण केली. हल्लीच्या जगात ही मानसिकता काही प्रसंगी दूर ठेवणं आवश्यक बनतं. मराठी माध्यमाच्या शाळेत शिकुन माझं काही बिघडलं नाही, मी बघा किती उच्च पदावर पोहोचलो असं म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविषयी मला आदर आहेच, पण जर इंग्लिश माध्यमात मी शिकलो असतो तर ह्यापेक्षा देखील अजुन पुढे गेलो असतो का असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारून पाहावा ही माझी नम्र विनंती !
बाकी मुंबई मेट्रोच्या स्टेशनातून बाहेर पडणारी मार्गिका थेट चकचकीत मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर प्रवेश करते हे पाहुन माझा ऊर भरून आला. तो अवाढव्य आवाका असलेला मॉल शनिवारी संध्याकाळी सुद्धा काही प्रमाणात ओसाड होता, हे पाहून मनाला बरं वाटलं म्हणजे लोक सायंकाळी घरी मराठी पुस्तकांचं कुटुंबासोबत वाचन वगैरे करीत असतील असे विचार मनात आले!
आमची गॅलरी चिमण्यांना आवडते असं दिसतंय. हल्ली पहाटे लवकर उजाडत असल्यानं सव्वा सहाच्या सुमारास येऊन त्या चिवचिवाट करू लागतात. चिमण्यांच्या चि...