मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १४ फेब्रुवारी, २०१५

हा खेळ आकड्यांचा!!



आकड्याचे  खेळ मोठ मोठे असतात. हा त्या मानाने छोटा खेळ. ह्या वर्षीच्या आता पर्यंतच्या तारखा लक्षात घेऊयात. प्रयत्न असा राहील की 
DD/MM/CCYY ह्या स्वरूपात लिहिलेली आजवरची प्रत्येक तारीख अशी गणिती चिन्हांच्या सहाय्याने अशी लिहावी की DD/MM/CCY ह्या भागातील आकड्यांवर केलेल्या गणिती क्रियेचे उत्तर  शेवटच्या Y इतके म्हणजे ५ येईल. इंग्लिश आकड्यांबद्दल क्षमस्व!

01/01/2015
(0
+1
+0
+1)
*2
+0
+1
=
5
02/01/2015
(0
+2)*
(0
+1)
*2
+0
+1
=
5
03/01/2015
 0
+3
+0
+1
+2
+0
-1
=
5
04/01/2015
(0
+4)*
(0+
1)
+2
+0
-1
=
5
05/01/2015
0
+5
+0
+1
-2
+0
-1
=
5
06/01/2015
0
+6
0-
(1*
2)
+0
+1
=
5
07/01/2015
0
+7
+0
+1
-2
+0
-1
=
5
08/01/2015
0
+8
0-
(1*
2)
+0
-1
=
5
09/01/2015
0
+9
0-
1
-2
+0
-1
=
5
10/01/2015
1
+0
+0
+1
+2
+0
+1
=
5
11/01/2015
(1*
1)
+0
+1
+2
+0
+1
=
5
12/01/2015
(1*
2)
+0
+(1
*2)
+0
+1
=
5
13/01/2015
(1*
3)
+0
+1
+2
+0
-1
=
5
14/01/2015
(1*
4)
+0
(1*
2)
+0
-1
=
5
15/01/2015
(1*
5)
+0
-1
+2
+0
-1
=
5
16/01/2015
1
+6
+0
+1
-2
+0
-1
=
5
17/01/2015
1
+7
+0
-(1*
2)
+0
-1
=
5
18/01/2015
1
+8
+0
-1
-2
+0
-1
=
5
19/01/2015
(1
*9)
+0
-1
-2
+0
-1
=
5
20/01/2015
2
+0
+0
+ (1
*2)
+0
+1
=
5
21/01/2015
(2
*1)
+0
+(1
*2)
+0
+1
=
5
22/01/2015
(2
*2)
+0
+(1
*2)
+0
-1
=
5
23/01/2015
2
+3
+0
-1
+2
+0
-1
=
5
24/01/2015
-2
+4
+0
+ (1
*2)
+0
+1
=
5
25/01/2015
2
+5
+0
-(1
*2)
+0
*1
=
5
26/01/2015
2
+6
+0
-(1
*2)
+0
-1
=
5
27/01/2015
-2
+7
+0
-1
+2
+0
-1
=
5
28/01/2015
-2
+8
+0
-(1
*2)
+0
+1
=
5
29/01/2015
-2
+9
+0
-1
-2
+0
+1
=
5
30/01/2015
3
+0

+(0
*1)
+2
+(0
*1)
=
5
31/01/2015
3
*1
+(0
*1)
+2
+(0
*1)
=
5
01/02/2015
0
*1
+0
+2
+2

+0

+1
=
5
02/02/2015
0
*2
+0
+2
+2

+0

+1

=
5
03/02/2015
0
*3
+0
+2
+2

+0

+1

=
5
04/02/2015
0
*4
+0
+2
+2

+0

+1

=
5
05/02/2015
0
*5
+0
+2


+2
+0

+1

=
5
06/02/2015
0
*6
+0
+2

+2

+0

+1

=
5
07/02/2015
0
*7
+0
+2

+2

+0

+1

=
5
08/02/2015
0
*8
+0
+2
+2

+0

+1

=
5
09/02/2015
0
*9
+0

+2
+2

+0

+1

=
5
10/02/2015
1
*0
+0
+2

+2

+0

+1

=
5
11/02/2015
1
*1
+0
+2


+2
+0
*1
=
5
12/02/2015
1
*2
+0
+2
+2
+0
-1
=
5
13/02/2015
-1
+3
+0
+2
+2
+0
-1
=
5
14/02/2015
1
+4
+0
+2
-2
+0
+1
=
5
 
 २ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी ह्या तारखांमध्ये थोडी लबाडी करण्यात आली आहे!!
बाकी घरी गणितीचिन्हाचा प्राधान्यक्रम समजणारे आणि आपले ऐकणारे बालक असल्यास ह्या वर्षातील कोणतीही तारीख घेऊन त्यांना वरील उद्योग करायला लावा!

रविवार, ८ फेब्रुवारी, २०१५

लेक लाडकी ह्या घरची…

पूर्वी वाक्य कानावर पडायचं, "पोरीला त्या घरी दिली!" कधी कधी "पोरीला त्या गावात दिली" असंही बोललं जायचं. जणू काही ज्याच्याशी लग्न लागणार तो नवरा मुलगा अगदी नगण्यच असायचा, निर्णयप्रक्रियेत त्याला फारसं महत्त्व नसायचं. बहुदा त्यावेळची परिस्थिती सुद्धा काही प्रमाणात ह्याला कारणीभूत असेल. शेतकरी कुटुंब असेल तर मुलीचं संपूर्ण आयुष्य कसं जाणार हे त्या कुटुंबाच्या जमीनजुमल्यावर अवलंबून असायचं. 

हल्ली असं ऐकायला मिळत नाही. कारणं अनेक! हल्ली लग्न जमविण्याची संधी आईवडिलांना कमी प्रमाणात मिळते. आणि मिळाली तर लग्न मुलाकडे, त्याच्या कर्तुत्वाकडे पाहून मग लग्न जमवलं जातं. फार तर फार त्याच्या आईवडिलांची चौकशी केली जाते. ह्याला कारणीभूत एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हल्ली "पोरीला त्या घरी दिली!" ह्या वाक्यात जे घर अभिप्रेत होतं, अशी घर फार दुर्मिळ झाली आहेत. 

हे घर म्हणजे एक संस्था होती; हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर एक पॅकेज होती. त्यात असायचं घराचं अंगण, घराभोवतीची बाग, घरामागचं तुळशीवृंदावन, विहीर, रहाट, मायेच्या गायी, उन्हापासूनच नव्हे तर संसारातील तापत्या क्षणापासून विसावा देणारा वटवृक्ष! आणि ह्यात सासरची असली म्हणून काय झालं पण प्रेमाची सावली देणारी माणसं असायची. सासू जरी अगदी कडक असली तरी कळत नकळत मायेच्या क्षणाचा शिडकावा करायची! सासरेबुवा शिस्त कधीकधी आपल्या सुनेसाठी थोडी हळवी व्हायची. घरात जर मोठी सून म्हणून प्रवेश केला असेल तर घरची संपूर्ण जबाबदारी अंगावर पडायची. धाकटे दीर अगदी मुलासारखे नसले तरी त्यांची काळजी घेण्याइतपत लहानच असायचे. धाकट्या नणंदा लग्नाच्या असायच्या. त्यांची आणि ह्या मोठ्या वहिनीची छोटी मोठी गुपिते असायची. घरी कामाला असणारे गडी माया लावून जायचे. आता हे सगळं वर्णन काहीसं आदर्श चित्र निर्माण करत आहे हे मान्य! 

ह्यात एक महत्वाचा मुद्दा यायचा. लग्नानंतर नवऱ्याबायकोच्या प्रेमाच्या नात्याला त्या काळात मुक्तपणाचा फारसा वाव लाभला नाही.  ह्या नात्याविषयी ना जास्त बोललं जात असावं ना एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाच्या अभिव्यक्तीला वाव असायचा. एकंदरीत घरात आलेल्या सुनेच्या आयुष्याचा बहुतांशी भाग हा तिने त्या घरासाठी आणि घरातील कुटुंबियासाठी व्यतीत करावा अशीच अपेक्षा असायची. आणि ह्याच कारणासाठी घराकडे पाहून मुलगी दिली जायची. नवऱ्याशी जुळो वा ना जुळो, तो तर महत्वाचा घटक नाही. पण बाकीचे सर्व घटक जे तिचं बहुतांशी आयुष्य कसं जाणार हे ठरवणार ते चांगले असले म्हणजे झालं अशी विचारसरणी असायची. बाकी मुलीची स्वतःची अशी ठाम मते बनायच्या आधीच अल्पवयात लग्न लावून द्यायचा ह्या मंडळींचा अट्टाहास असायचा.

हल्ली हे घर नाहीसं झालं, फ्लॅट आले. नवऱ्याव्यतिरिक्त ज्यांच्याशी संवाद साधला जायचा अशी दीर, जाऊ, नणंद ही समवयस्क आणि पुतणे, पुतणी, भाचेमंडळी ह्या सर्वांशी संपर्क कमी झाला. जोवर राजाराणीच्या संसारात सगळं काही सुरळीत चाललं असतं त्यावेळी ह्या मंडळींची उणीव सुद्धा भासत नाही; पण जर कुठं काही बिनसलं तर ही सारी मंडळी, आणि आधी वर्णिलेले सर्व घटक मामला एका विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे न जाऊ द्यायला सहायभूत ठरायचे. आणि हो आधी वर्णिलेल्या गावात अशी किती चांगल्या संस्था म्हणून बनलेली घर आहेत हा घटक सुद्धा टोकाची भूमिका घेण्यापासून मंडळींना थांबवायचा.  म्हणूनच मुलगी कोणत्या गावात दिली हे महत्वाचे!



अजून एक वाक्य आठवलं - सून आणावी ती गरिबाघरची आणि पोरगी द्यावी ती श्रीमंताघरी! हे वाक्याकडे मी आधी फारसं लक्ष दिलं नव्हतं. आज थोडा विचार केल्यावर असं वाटायला लागलं की गरिबाघरची मुलगी संस्काराचे बाळकडू अगदी कोळून प्याली असेल आणि ती आपल्या घरचं संस्कारमय वातावरण कायम ठेवेल ह्याची शाश्वती! आणि आपली मुलगी संस्कारमय घरातील श्रीमंताघरी जाऊन तिथे संस्कारांची पेरणी करेल! तिला लक्ष्मीची काळजी करायला नको! 

गेले ते दिन गेले! ना ती घरे राहिली ना त्या घरांची संस्कृती! ही घरं सोडून आपण प्रगती गाठली. पण प्रगती केवळ एका पिढीत आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच गाठून चालत नसतं. वयाच्या तिशीच्या आसपास प्रगतीची शिखरे गाठलेली पण मग पुढे काय करायचं हे न कळलेली अनेक उदाहरणं पाहायला मिळतात; प्रगतीचा आलेख कमी वेगाने वर गेला तरी चालेल पण आपण गाठलेल्या प्रगतीचा पाया त्या पातळीवर दुसऱ्या पिढीला देता आला पाहिजे! आणि नेमक्या ह्या मुद्द्यावर ह्या घरांची उणीव अधिकाधिक जाणवते!! प्रगती गाठलेला माणूस कदाचित चुकू शकतो पण उंचावलेलं एक घर मात्र पुढची पिढी घडवायला कधीच चुकणार नाही!

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०१५

सांग सांग भोलानाथ!!

 
जानेवारी मध्ये अचानक वाचनात आलं. बहुदा तिसरा किंवा चौथा सोमवार होता तो! वर्षातील सर्वात कंटाळवाणा दिवस म्हणून जाणकार लोकांनी त्या दिवसाची निवड केली होती. त्यामागे अनेक कारणे दिली होती. बरीचशी मला पटली नाहीत. मग मी मला कंटाळा येणारे क्षण शोधावयास लागलो. 
जानेवारी हा नक्कीच सर्वात कंटाळवाणा महिना! माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी तर अधिकच! डिसेंबर महिन्यात सर्व अमेरिकन सहकारी, बॉस वगैरे सुट्टीवर असतात म्हणून कार्यालयात खूप मोकळे (कमी तणावाचे) वातावरण असते. वर्षभर राखून ठेवलेल्या बऱ्याच सुट्ट्या वापरायची संधी मिळते. मुलांच्या शाळेत सुद्धा परीक्षेचा मारा कमी असल्याने त्या पातळीवर सुद्धा मोकळेपणा मिळतो. वसईत क्रिसमसमध्ये धमाल करून झालेली असते. आणि मग अशा वातावरणातून जानेवारी उजाडतो. गेले दोन तीन वर्षे १ जानेवारीची सुट्टी आमच्याकडे बंद झाली आहे पण अमेरिकेच्या ऑफिसात सुरूच आहे. त्यामुळे वर्षाची सुरुवात चांगली होते. म्हणजे नवीन वर्षातील एक सुट्टी सुरुवातीलाच न गेल्याचे समाधान मिळते आणि अमेरिकेची मंडळी सुट्टीवर असल्याने मिटिंगचा तणाव नसतो. 
पण त्या नंतर मात्र कठीण काळ उगवतो. सुट्टीवरून कामावर परतणाऱ्या माणसांचे दोन प्रकार असतात. 
पहिल्या प्रकारातील माणसे आता सुट्टी घेतली त्यात ताजेतवाने होऊन मग नवीन जोमाने कामाला लागतात. नवीन वर्षाचे निर्धार, कामाच्या याद्या वगैरे बनवून बाकीच्यांना भंडावून सोडतात. ह्यात एक महत्वाचा मुद्दा असतो - उत्साहाच्या भरात आपल्याला वाटणारा कामाच्या प्राधान्याचा क्रम आपल्या बॉसच्या, संघटनेच्या प्राधान्यक्रमाशी मिळताजुळता आहे की नाही हे तपासून पाहणे फार महत्वाचे असते. नाहीतर प्रत्येक क्षणी कामात गर्क राहण्याच्या अट्टाहासापायी चुकीच्या दिशेने खूप पुढे जायला होते. 
दुसऱ्या प्रकारातील माणसे जानेवारीत तापायला (म्हणजेच पूर्ण जोमाने कामाला लागायला किंवा झोन मध्ये यायला) जरा वेळ घेतात. ह्यातही उपप्रकार असतात. ह्यातील काहीजण चलाख असतात. जोवर योग्य दिशा मिळत नाही तोवर ते थंड घेतात. एकदा का योग्य दिशा मिळाली की मग अगदी झपाट्याने कामाला लागतात.  अजून एक खोलवर मुद्दा. नेहमीच स्मार्ट बनून काम करणे शक्य नसते. स्मार्ट काम आणि यांत्रिक काम ह्याचे परिस्थितीनुसार योग्य मिश्रण जमायला हवं.
दुसरा प्रकार जन्मजात आळशी असतो. जितका वेळ चालढकल करता येईल तितका वेळ चालढकल करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. 

ह्यात काही गोष्टी आपण करू शकतो. जसे की रविवारी झोपण्याआधी सोमवारची जमेल तितकी तयारी करणे, सोमवारी नेहमीच्या वेळेपेक्षा आधी ऑफिसात पोहोचून तिथल्या वातावरणाला सरावायचा प्रयत्न करणे. सोमवारी एखादी हलकीफुलकी (विषयावरील) बैठक ठेवणे वगैरे वगैरे!
इतकं करून सुद्धा बेभान मन एखाद्या गंभीर बैठकीच्या वेळी सुद्धा कुठंतरी भरकटत रहातं. चेहऱ्यावरील भाव आणि मनातील विचार ह्यांचा संबंध जोडला जाऊ नये म्हणून मग खूप प्रयत्न करावे लागतात! 

बाकी मग मंगळवार संध्याकाळ वगैरे उजाडली की हळूहळू मन प्रसन्न व्हायला लागतं. ह्यात दोन प्रकारे हातभार लागतो. दोन दिवस कार्यालयात काम करून मन ताळ्यावर आलं असतं आणि दुसरं म्हणजे शुक्रवार संध्याकाळ जवळ येत चालली असते. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला एक आनंदक्षण म्हणजे शुक्रवार संध्याकाळ! तुम्ही कितीही मोठ्या पदावर गेलात, प्रोजेक्ट कितीही बिकट परिस्थितीत असले तरी माणसाने शुक्रवार संध्याकाळ आपल्याला हवी तशी अनुभवावी! त्या वेळेला मनात कामाचे कोणतेही विचार येऊ देऊ नयेत! तळीराम मंडळींनी ऐच्छिक ठिकाणे गाठावीत!
  वर्षे भराभर निघून जातात. सोमवार ते शुक्रवार हा प्रवास कसा पटकन संपला हे जसं समजत नाही तसे जानेवारी ते डिसेंबर हा प्रवासही झटकन संपत जातो.  वयाच्या / व्यावसायिक कारकीर्दीच्या दृष्टीने विचार केला तर आपण बुधवारपर्यंत पोहोचलो असतो. पण इथला शुक्रवार मात्र जमेल तितका पुढे ढकलावासा वाटतो!

आपण वयाने मोठे होत जातो, वाढलेल्या वयानुसार आणि कदाचित वाढलेल्या अनुभवामुळे आपण वरच्या पदावर जाण्याची शक्यता वाढीस लागते. अगदी उच्चपदस्थ लोकांनी उदात्त विधान करण्याची पद्धत असते. त्याचप्रमाणे थोडेसं वरती पोहोचलो की मग आपणसुद्धा अशी काही विधानं करू लागतो. पण एक सत्य मात्र कायम राहते. बालवाडीत आईने वर्गात सोडल्यावर डोळ्यात येणारे अश्रू जरी लपवता येत असले तरी नजर मात्र दरवाजाकडे लागून रहायची. तसंच अजूनही सोमवारी ऑफिसात कार्ड स्वाईप करताना सुद्धा भावना मात्र तीच असते!

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...