मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

श्रीमंतवर्गाच्या भुमिकेतून !



ही पोस्ट लिहणं कठीण असणार आहे. खरंतर ह्यात माझ्या काही  मर्यादा स्पष्ट होणार आहेत. कोणालाही दुखवू नये ह्याचा विचार करताना एखादी गोष्ट किती निर्भीडपणे मांडु शकतो ह्याविषयीच्या माझ्या ज्या मर्यादा आहेत त्या इथं स्पष्ट होणार आहेत. आणि आतापर्यंत मी ज्या सामान्य मध्यमवर्गीय वर्गाच्या चष्म्यातुन बऱ्याचशा पोस्ट लिहिल्या त्याच्याशी विसंगत अशी ही पोस्ट असणार आहे. आणि माझ्या मनातील ह्या विषय मांडतानाचा सुसंगतीचा अभाव इथं स्पष्ट दिसणार आहे. 

ह्या आठवड्याच्या आरंभीस मुंबईतला एक डॉक्टर आपली बाईक घेऊन आपल्या साथीदारांसहित भ्रमंतीवर असताना बहुदा गुजरातमध्ये अपघातात मरण पावला. अपघाताचे कारण काय तर अचानक रस्ता क्रॉस करणारी लोक समोर आल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात त्याची बाईक उलटली गेली आणि समोरुन भरधाव वेगानं येणाऱ्या अवजड वाहनाखाली तो सापडला. 

ज्यावेळी एखाद्या कारखाली येऊन माणुस मरण पावतो त्यावेळी दिल्या जाणाऱ्या बातमीला कुठंतरी श्रीमंत विरुद्ध सामान्य / गरीब वर्गलढा असं अप्रत्यक्षपणे रुप दिलं जातं. आणि श्रीमंताची चुक ह्यावर आपण हलकल्लोळ निर्माण करतो. पण ज्यावेळी सामान्य / गरीब माणसांच्या चुकीमुळे एखादा निरपराध माणुस बळी पडतो त्यावेळी मात्र फारशी चर्चा होत नाही. आता ही पोस्ट लिहिताना सामान्य आणि गरीब ह्या दोन संज्ञा एकाच अर्थानं वापरणं योग्य आहे का हा सुद्धा वादाचा मुद्दा किंबहुना हे चुकीचंच !

तटस्थपणे पाहिलं असता असं जाणवतं की आपली वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या ह्या सर्वांनी दिलेल्या बहुतांशी बातम्या ह्या सामान्य माणसाच्या नजरेतुन पाहिल्यासारख्या वाटतात. जो काही श्रीमंत वर्ग आहे त्याला काहीशी आपण बाकींच्यापासून वगळले जात आहोत अशी भावना निर्माण होत असणार. 
श्रीमंतवर्गाला आपण सर्व मध्यमवर्गीय लोक एखाद्या stereotype नजरेतुन पाहतो. काही लोक मेहनतीच्या जोरावर श्रीमंत बनतात, काहीजण वारसाहक्काने श्रीमंत झालेले असतात तर काहीजण गैरमार्गाचा वापर करुन श्रीमंत बनलेले असतात. पण सामान्यवर्ग श्रीमंतांकडे पाहताना बहुतांशी ते सारे शेवटच्या प्रकारातील असतील असाच समज करुन पाहत असतो. 

श्रीमंत लोक वरील उल्लेखलेल्या कोणत्याही मार्गाने श्रीमंत झालेले असोत बदलत्या काळानुसार श्रीमंती टिकविणे हे काही अगदी सोपं काम नसतं. त्यातसुद्धा मेहनत करावी लागते, हुशारीनं निर्णय घ्यावे लागतात, काहीसे रिस्की (धोकादायक) निर्णय घ्यावे लागतात. पण साऱ्या गोष्टी एकतर सामान्य माणसांना कळत नाहीत किंवा त्याच्याकडं सोयिस्कररित्या दुर्लक्ष केलं  जातं. 

समाजाचं फक्त श्रीमंत आणि सामान्य / गरीब ह्या दोन प्रकारात वर्गीकरण करणं चुकीचं आहे हे मी जाणुन आहे. सामान्य वर्गातुन श्रीमंतीकडे प्रवास करायला प्रत्येक काळ संधी देत असतो. आणि ह्या मार्गावर असणारे लोक नक्कीच वरील परिच्छेदात वर्णिलेले काही गुणधर्म दर्शवत असतात. 

माझा रोख आहे तो आपल्या सामान्यत्वाच्या प्रेमात पडलेल्या वर्गाकडे ! आपण सामान्य आहोत म्हणुन आम्हांला सहानुभूती मिळायला हवी अशी अदृश्य भावना ह्या वर्गात सतत वसत असते. आमच्या सर्व समस्यांसाठी सरकार जबाबदार आहे आणि त्यांनीच त्या सोडवायला हव्या अशी भावना घेऊन ह्यांच्या पिढ्यानपिढ्या वावरत असतात. काळाच्या पुढे पाहण्याच्या वृत्तीचा, चिकाटीचा अभाव असतो किंवा हे गुण आपल्यात आणि पुढील पिढीत विकसित करता येऊ शकतात ह्या जाणिवेचा पुर्ण अभाव ह्यांच्यात असतो. पिढ्यानपिढ्या सामान्यत्वाच्या प्रेमात पडलेला वर्ग हा देशाच्या / समाजाच्या प्रगतीसाठी ड्रॅग (अवजड ओझं ) बनु शकतो. संपुर्ण सामान्यत्वाने भरलेला समाज हा कोणतीही प्रगती करु शकत नाही. 

श्रीमंतांना सरसकट अयोग्य कंसात बसविणे चुकीचं आहे. श्रीमंत लोकांच्या खर्चिक वृत्तीमुळं अर्थव्यवस्थेला चालना मिळते, ते बऱ्याचवेळा रोजगार निर्मिती करतात. आपल्या राहणीमानामुळे बाकीच्या वर्गापुढं एक स्वप्न बघण्यासाठी चित्र उभं ठेवतात. आता इथं एक मुद्दा मांडला जाऊ शकतो की तू श्रीमंतांची बाजू मांडतोस पण श्रीमंत लोकांना सामान्यांची काही चिंता पडली आहे का? त्यांना सामान्य लोकांच्यात मिसळण्यास आवडतं का?  आता ही चर्चा मी एका दुसऱ्या पातळीवरुन बघू इच्छितो. ज्यावेळी सामान्यत्व आणि बेसिक एटीकेट्सचा अभाव ह्या दोन गोष्टी एकत्र येतात त्यावेळी मग श्रीमंतांनाच नव्हे तर कोणालाही संताप येऊ शकतो. आता श्रीमंती आणि बेसिक एटीकेट्स ह्या दोन गोष्टी सतत हात मिळवुनच चालतात असंही नाही पण श्रीमंती तुम्हांला बेसिक एटीकेट्सला खिडकीबाहेर फेकुन देण्याचं सामर्थ्य देते. 

सारांश - श्रीमंतांना सरसकट अयोग्य कंसात बसविणे चुकीचं आहे. त्यांच्यातील गुणांकडे सुद्धा उघड्या डोळ्यांनी पाहा. सामान्यत्व तुम्हांला दुनियेने तुमच्याकडे सहानुभूतीनं पाहावं ह्याचा परवाना देत नाही. सामान्यत्वामध्येच कायम राहिलं पाहिजे अशी विचारसरणी ठेवू नका. जाताजाता सुचलं - आर्थिक सामान्यत्व असलं तरी चालेल पण आर्थिक आणि वैचारिक सामान्यत्वाच्या एकत्र खाईतून जितक्या लवकर जमेल तितकं बाहेर या. आर्थिक किंवा वैचारिक श्रीमंतीचा पल्ला एका पिढीला गाठता येत नसला तरी प्रत्येक पिढीने त्या दिशेनं थोडी थोडी प्रगती केली पाहिजे. 

२ टिप्पण्या:

  1. Rich person defination is very subjective. India as a land always respect richness in life cultivate its culture through nurturing music, food, dance, enlightening mind and soul by variuos knowledge branches . Being adequate food producer for billion of people by this fertile land for centuries, there was no need of accumulation for tomorrow. that is why hording wealth is not in सामान्य bhartiya belief system. and will always will remain like that.

    coming to the author frustration on this normal prople belief system. life standards of many countries has significantly improved in healthcare, transportation, education with the help of good governance, strict administration, adoption of technology and hard work and high work ethics by normal people of that country. today in india all goodies are only available for creamy layer of society. and normal people even not near to that ecosystem to prosper and establish themselves.
    author may want us to change noal person mentality. aspire for good life, he want us to keep motivated and suggest us to change the outlook towards rich people. this thinking is true who genuinely understand to work towards wellbeing and also create opportunity for others to excel in life.

    by now it is far away dream for india as large society of normal people. however, india is always evolving society. as per author, change in common man positive thinking is critical and the only way to change the present and future of this country. otherwise politician will only sell us mungerilal ke hasin sapane and enjoy power ruling on us.

    उत्तर द्याहटवा
  2. हे... खूपच चपखल.. मस्तच..आणी हो.. परफेक्टही..

    उत्तर द्याहटवा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...