हल्ली प्रत्येकजण चिकिस्तक बनला
आहे. मुलभूत गरजा
पूर्ण झाल्यावर करणार
तरी काय म्हणा?
चिकीस्ता कोणत्या गोष्टीची, किती
प्रमाणात करावी हा
ज्याचा त्याचा वैयक्तिक
प्रश्न. चिकीस्तेचे फायदे
/ तोटे नानाविध. फायदे
म्हणायचे झाले तर
आपल्या ज्ञानात भर
पडते, एखाद्या गोष्टीची,
व्यक्तीची आपल्याला सर्वांगाने माहिती
होते. ह्या माहितीचा
वापर आपण भविष्यात
योग्य निर्णय घेण्यासाठी
करू शकतो. तोटे
कोणते? चिकीस्तेच्या मार्गाच्या
सुरुवातीलाच एक पाटी
लावलेली असते 'ENTER AT YOUR OWN RISK'. काही गोष्टींच्या
बाबतीत असे म्हणावे
लागेल की अज्ञानातच
सुख असते. साधे
उदाहरण द्यायचे झाले
तर आपल्या आहाराविषयीच्या
सवयी. ज्या क्षणी
तुम्हाला कॅलरी ह्या
प्रकाराची माहिती होते
त्यावेळी तुमच्या आयुष्यातील जिव्हा
सुखाला तुम्ही मुकण्याचा
धोका संभवतो. कोणत्याही
नातेसंबंधांची जास्त चिकीस्ता
करू नये. जीवनातील
काही सुंदर गोष्टी
दुरूनच सुंदर भासतात
त्यांना तसेच राहू
द्यावे!
सुनियोजित सखोल विश्लेषणानंतर फार
कमी गोष्टींची / व्यक्तींची महती कायम राहू
शकते. हे आपल्या पूर्वजांना
पक्के ठाऊक होते. आपण
ही गोष्ट थोडीतरी
ध्यानात ठेवावयास हवी !शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
२०२४ अनुभव - भाग २
१. मनःस्वाथ्यासाठी लोक खरोखर संघर्ष करताना दिसताहेत. मी सुद्धा करतोय. माझा संघर्ष वेगळा आहे, तुमचा वेगळा असेल. जीवनातील एका क्षणी आपल्याला त...

-
लंडनच्या हीथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर जुन्या आठवणी जागृत झाल्या. २००० साली प्रथमच परदेशी दौऱ्यावर हीथ्रो विमानतळावर उतरलो होतो. त्यावेळी स...
-
बोर्डी हे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरातच्या सीमेवर वसलेलं एक शांत गाव. गावाची लोकसंख्या अजूनही विरळ अशी म्हणावी असल्याने बोर्ड...
-
नुकत्याच आटोपलेल्या बारा दिवसांच्या युरोप दौऱ्यानंतर मनात अनेक सकारात्मक भावना दाटल्या आहेत. भव्य ऐतिहासिक वास्तू, निसर्गाची डोळ्यात साठवून ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा