हल्ली प्रत्येकजण चिकिस्तक बनला
आहे. मुलभूत गरजा
पूर्ण झाल्यावर करणार
तरी काय म्हणा?
चिकीस्ता कोणत्या गोष्टीची, किती
प्रमाणात करावी हा
ज्याचा त्याचा वैयक्तिक
प्रश्न. चिकीस्तेचे फायदे
/ तोटे नानाविध. फायदे
म्हणायचे झाले तर
आपल्या ज्ञानात भर
पडते, एखाद्या गोष्टीची,
व्यक्तीची आपल्याला सर्वांगाने माहिती
होते. ह्या माहितीचा
वापर आपण भविष्यात
योग्य निर्णय घेण्यासाठी
करू शकतो. तोटे
कोणते? चिकीस्तेच्या मार्गाच्या
सुरुवातीलाच एक पाटी
लावलेली असते 'ENTER AT YOUR OWN RISK'. काही गोष्टींच्या
बाबतीत असे म्हणावे
लागेल की अज्ञानातच
सुख असते. साधे
उदाहरण द्यायचे झाले
तर आपल्या आहाराविषयीच्या
सवयी. ज्या क्षणी
तुम्हाला कॅलरी ह्या
प्रकाराची माहिती होते
त्यावेळी तुमच्या आयुष्यातील जिव्हा
सुखाला तुम्ही मुकण्याचा
धोका संभवतो. कोणत्याही
नातेसंबंधांची जास्त चिकीस्ता
करू नये. जीवनातील
काही सुंदर गोष्टी
दुरूनच सुंदर भासतात
त्यांना तसेच राहू
द्यावे!
सुनियोजित सखोल विश्लेषणानंतर फार
कमी गोष्टींची / व्यक्तींची महती कायम राहू
शकते. हे आपल्या पूर्वजांना
पक्के ठाऊक होते. आपण
ही गोष्ट थोडीतरी
ध्यानात ठेवावयास हवी !शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Park Your Thoughts!
मराठी माध्यमातुन इंग्लिशचे धडे अगदी एकाग्रतेने गिरवुन व्यावसायिक जगात प्रवेश करून आता अनेक वर्षे लोटली. This is a boy. His name is Gopal. ...
-
गतकाळातील वैभवशाली साहित्यिक इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी आपण जरी गमावली असली तरी सुदैवानं ह्या कालखंडातील उत्कृष्ट का...
-
पुस्तक प्रदर्शनात घेतलेल्या तीन पुस्तकांपैकी वि . स. खांडेकरांची अश्रू ही कादंबरी एक . कथा म्हणून बघितली तर साधी सुधी . एका आदर्श वादी श...
-
महाराष्ट्राला समाजसुधारकांची थोर परंपरा लाभली आहे. तत्कालीन महाराष्ट्रात ज्या लोकरुढींविषयी ह्या विचारवंतांना सुधारणा कराव्याशा वाटल्या त...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा