हल्लीच
एक मस्त वाक्य
वाचनात आलं, जगाचा
मुलभूत प्रश्न असा
आहे की बुद्धिमान
लोक गोंधळलेले आहेत
आणि मूर्ख लोकांचा
आत्मविश्वास ओसंडून वाहत
चालला आहे. पण मला जाणवले
की माझाही आत्मविश्वास
सध्या ओसंडून चालला
आहे. त्यामुळे मी
थोडे गोंधळलो!!! अथवा
गोंधळण्याचे नाटक केले.
असो, बुद्धिमान लोक का गोंधळले असावेत? ज्ञानाचा विस्फोट झाल्यामुळे? ज्ञानतृष्णा भागवायची असेल तर मर्यादा कधी नव्हती आणि कधी नसणारच! माझ्या मते बुद्धिमान लोकांना सामाजिक जीवनात त्याचं झपाटयान खालावणारे स्थान गोंधळवून टाकत आहे. पूर्वी जातीव्यवस्था एक गृहीतक करत असे की बुद्धिमान लोक एका विशिष्ट जातीतून निर्माण होणार. त्यामुळे त्या जातीने एकत्रित राहून सामाजिक जीवनात वर्चस्व प्रस्थापित केलं. परंतु ही व्यवस्था दीर्घकाळ टिकणारी नव्हती. ही व्यवस्था कोलमडून पडल्यावर त्याला पर्यायी व्यवस्था जी विविध जातीतील बुद्धिमान लोकांना एकत्र आणू शकेल, निर्माण करण्यास भारतीय समाजास अपयश आल. त्यामुळे बुद्धिमान लोक विखुरले गेले. त्यामुळे मूर्ख लोकांचे फावले. गोंधळ घालायला एक मूर्ख पुरेसा असतो, परंतु त्याचा गोंधळ आवरायला एकट्या बुद्धीमानास धैर्य नसत.
त्यामुळे आपल्या समाजात नव्याने रूढ होणार्या चालीरीती प्रस्थापित करण्यात बुद्धीजीवी वर्गाचा फार कमी सहभाग दिसतो. बुद्धिमान वर्गाची अजून एक गरज म्हणजे त्याला विचार करायला शांत वातावरण हवे असत. ही शांतताच बर्याच प्रमाणात त्याच्याकडून हिरावून घेतली गेली आहे. आता ही शांतता का हिरावली गेली कारण बुद्धिमान लोकांनी लक्ष्मीचा मोह धरला. लक्ष्मीचा मोह स्वतःचा उत्कर्ष करून शकतो परंतु समाजाचा नव्हे. बुद्धीमान लोकांनी सरस्वतीची उपासना करावी हेच खरे. परंतु त्यांच्यापुढे प्रलोभने इतकी निर्माण केली गेली की त्यांनी सरस्वती उपासना सोडली. बुद्धिमान लोकांना एकत्र आणू शकणारा एक समान घटक शोधून काढणे ही काळाची गरज आहे!
असो, बुद्धिमान लोक का गोंधळले असावेत? ज्ञानाचा विस्फोट झाल्यामुळे? ज्ञानतृष्णा भागवायची असेल तर मर्यादा कधी नव्हती आणि कधी नसणारच! माझ्या मते बुद्धिमान लोकांना सामाजिक जीवनात त्याचं झपाटयान खालावणारे स्थान गोंधळवून टाकत आहे. पूर्वी जातीव्यवस्था एक गृहीतक करत असे की बुद्धिमान लोक एका विशिष्ट जातीतून निर्माण होणार. त्यामुळे त्या जातीने एकत्रित राहून सामाजिक जीवनात वर्चस्व प्रस्थापित केलं. परंतु ही व्यवस्था दीर्घकाळ टिकणारी नव्हती. ही व्यवस्था कोलमडून पडल्यावर त्याला पर्यायी व्यवस्था जी विविध जातीतील बुद्धिमान लोकांना एकत्र आणू शकेल, निर्माण करण्यास भारतीय समाजास अपयश आल. त्यामुळे बुद्धिमान लोक विखुरले गेले. त्यामुळे मूर्ख लोकांचे फावले. गोंधळ घालायला एक मूर्ख पुरेसा असतो, परंतु त्याचा गोंधळ आवरायला एकट्या बुद्धीमानास धैर्य नसत.
त्यामुळे आपल्या समाजात नव्याने रूढ होणार्या चालीरीती प्रस्थापित करण्यात बुद्धीजीवी वर्गाचा फार कमी सहभाग दिसतो. बुद्धिमान वर्गाची अजून एक गरज म्हणजे त्याला विचार करायला शांत वातावरण हवे असत. ही शांतताच बर्याच प्रमाणात त्याच्याकडून हिरावून घेतली गेली आहे. आता ही शांतता का हिरावली गेली कारण बुद्धिमान लोकांनी लक्ष्मीचा मोह धरला. लक्ष्मीचा मोह स्वतःचा उत्कर्ष करून शकतो परंतु समाजाचा नव्हे. बुद्धीमान लोकांनी सरस्वतीची उपासना करावी हेच खरे. परंतु त्यांच्यापुढे प्रलोभने इतकी निर्माण केली गेली की त्यांनी सरस्वती उपासना सोडली. बुद्धिमान लोकांना एकत्र आणू शकणारा एक समान घटक शोधून काढणे ही काळाची गरज आहे!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा